
मी स्पष्टपणे प्रतिपादन दिले होते की जाक्सन सभा ही धर्म वेडेपणाचे असून आगाऊ भाकीत करून अंधारातील आत्म्यांना अधिक अंधारामध्ये ढकलण्याचा शत्रुपक्ष आहे. अधिकार वाणीने त्यांनी भविष्य केले होते की १८४४ मध्ये कृपेचा काळ सर्वांसाठी बंद होईल. त्या नंतर लोकसभेमध्ये मी स्पष्ट पणे सांगितले होते की १८४४ नंतर देवाकडून कोणत्याच प्रकारचा संदेश देण्यात आला नव्हता. - सिलेक्टेड मेसेज २:७३ (१८८५)
सध्या आपली स्थिती वाट पाहत राहणे अशीच आहे १८४४ नंतर आतापर्यंत कृपेचा काळ बंद होण्याविषयी कोणताच संदेश आला नव्हता. तसेच प्रभू येण्याची वेळ सुद्धा निश्चित झाली नाही. - मॅन्युस्क्रिप्ट रिलीझ १०:२७ (१८८८) निश्चित काळासंबंधी लोकांना दुसरा संदेश मिळाला नाही. प्रकटी १०:४,६ प्रमाणे १८४२ ते १८४४ या काळानंतर निश्चित भविष्यवाणी झाली नाही. दीर्घ काळची ही कालगणती १८४४ च्या शारद ऋतूपर्यंत पोहोचली. - द एस डी ए बायबल कॉमेंटरी ७:९७१ (१९००).
एलन व्हाईटची अपेक्षा होती की येशूचे येणे तिच्या काळातच होईल
मला दाखविण्यात आले की मंडळी सभेसाठी हजर होती. देवदूत म्हणाला, “लोकांना काही अन्न शेवटच्या सात पिडांचे काही विषय काही जिवंत राहतील आणि येशूच्या येण्याच्या घटकेला त्याचे परिवर्तन होईल. - टेस्टिमोनीज फॉर द चर्च १:१३१,१३२ (१८५६)
कारण वेळ थोडा आहे म्हणून आपण अधिक सामर्थ्यानिशी कार्य करणे आवश्यक आहे. आपली मुले महाविद्यालयात जाऊ शकणार नाहीत. - टेस्टिमोनीज फॉर द चर्च ३:१५९ (१८७२).
या वेळी मुले नसणे हे शहाणपणाचे आहे. वेळ अगदी थोडा आहे. शेवटच्या दिवसातील धोके आपल्यावर घोंगावत आहेत आणि या अगोदर लहान मुले मोठ्या प्रमाणात नाश पावतील - लेटर ४८, १८७६.
सध्याच्या काळामध्ये जगाचा इतिहास लवकरच संपुष्टात येणार आहे. आपण या त्रासामध्ये लवकरच प्रवेश करणार आहोत. ही येणारी संकटे पूर्वी कधीच आली नव्हती. लग्न करून देणे -घेणे आता नकोच. स्त्री पुरुष दोघांनी हे ओळखून घ्यावे. -टेस्टिमोनीज फॉर द चर्च ५३६६ (१८८५).
ती घटका येईलच , दूर नाही आणि काहींचा विश्वास वाटतो की ते आद्यदूताची वाणी डोंगरातून देवाच्या आवाजाचा प्रतिध्वनी ऐकतील तो पर्यंत जगामध्ये जिवंत राहतील. आद्यदूताची तुतारीचा आवाज त्यांच्या कानी पडेल. - रिव्हिव्ह अँड हेरॉल्ड ३१ जुलै १८८८.
कसोटीचा काळ अगदी आपल्या जवळ आहे. तिसऱ्या देवदूताची मोठी आरोळी ही अगोदरच सुरु झाली आहे. ख्रिस्ताच्या धार्मिकांना याचा अविष्कार झाला असेल. पापाची क्षमा करणारा व तारणारा ख्रिस्ताचे ते लोक असतील. - सेलेक्टड मेसेज १:३६३ (१८९२).
उशीर होण्याचा उलगडा
दीर्घ रात्र उदासपणे हळूहळू सरकत होती यामुळे सकाळ होण्यासाठी उशीर होत होता. यामुळे दयेलाही उशीर होत होता. कारण घरधनी आला तर अनेकजण तयार नसतील. - टेस्टिमोनीज फॉर द चर्च २:१९४ (१८६८).
१८४४ नंतरच्या घोर निराशेनंतर एडव्हेंटिस्ट लोकांचा तोच विश्वास राहून ते एकचित्ताने राहत होते. देवाकडून त्यांना संदेश येत होते. तिसऱ्या देवदूताचा संदेश आणि पवित्र आत्म्याचे सामर्थ्य त्यांना मिळत गेले. तिसऱ्या देवदूताचा संदेश जगाला पवित्र आत्म्याकरवी सादर करण्यात आला आहे. त्यांनी तिसऱ्या देवदूताचा संदेश ऐकला असता तर त्यांनी देवाचे तारण पाहिले असते देवाचे कार्य संपुष्टात आले असते आणि येशूचे येणे पूर्वीच झाले असते. त्यानेच त्याच्या लोकांना तेव्हाच घेऊन गेला असता. त्यांना पारितोषिक मिळाले असते. येशूचे हे उशिरा येणे ही देवाच्या इच्छाप्रमाणे नाही.पूर्वीचा इस्राएली लोकांनी त्यांच्या अविश्वासाने आणि कुरकुरपणामुळे त्यांनी स्वतः चाळीस वर्षे कनानापासून दूर राहावे लागले. त्याच प्रकारे आजचे हे जग आणि आधुनिक लोक त्यांच्या प्रवृत्तीमुळे स्वर्गीय कनानापासून दूर राहत आहेत. आधुनिक इस्राएली लोकांमूळे येशूला यायला उशीर होत आहे. त्यांच्या संशयी वृत्तीमुळे त्यांनीच देवाचे अभिवचन खोटे ठरविले. अशाप्रकारे देवाच्या या पदवीधर धर्मपुढाऱ्यांनी एकमेकांनी मदभेद आणि अविश्वासाने अनेक वर्ष जगाला दुःख आणि पापामध्ये ठेवले आहे. - इव्हाचेलिझ्म ६९५ (१८८३). देवाने दीक्षा देऊन नेमून दिलेले कार्य ख्रिस्ताच्या मंडळीने व्यवस्तीत केले आहे काय? तसे झाले असते तर संपूर्ण जगाला ख्रिस्त येत असल्याची जाणीव झाली असती. आणि येशू ख्रिस्त सामर्थ्याने आणि गौरवाने जगामध्ये आला असता. - द डिझायर ऑफ द एजेस ६३३,६३४ (१८९८).
देवाची वचने सशर्त
देवाच्या देवदूताने आपल्या संदेशामध्ये मानवाला वेळ अगदी थोडी असल्याचे सादर केले (पाहा रोम १३:११, १२ १ करिंथ ७:२९) १ थेस्सलिनी ४:१५, १७ इब्री १०:२५, याकोब ५:८,९;१ पेत्र ४:७ प्रकटी २२:७) या विषयी मला सतत सांगण्यात आले. हे खरे आहे की आपल्या अपेक्षेपेक्षा काळापुढे चालला आहे व दिरंगाई होत आहे हा संदेश देऊन बराच काळ लोटला आहे. आपल्या अपेक्षे प्रमाणे तारणारा अजून आला नाही. तर मग देवाचे वचन खोटे ठरले आहे काय? कधीच नाही. म्हणून लक्षात ठेवणे आवश्यक आहे की अभिवचन न देणे आणि धमकी देणे यामध्ये फरक आहे. यामध्ये अट आहे. (वाचा यिर्मया १८:७-१० योहान ३:४-१०).
आपण या जगामध्ये कदाचित राहू कारण आपण सतत आज्ञा भंग करतो. आणखी अधिक वर्षे येथेच राहू जसे इस्राएल लोकांनी केले परंतू ख्रिस्ताकरिता याचा दोष देवाला देता येणार नाही याची दक्षता घ्या कारण मनुष्य सतत वाईटच करून तोच त्याची फळे भोगतो. - इव्होजेलिसम ६९५, ६९६ (१९०१).